Wednesday, April 30, 2008

मैत्री कशी ह्ळुवार उमलते

मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव हात
हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

No comments: