Wednesday, April 30, 2008

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,
त्याला सामोरच जायचं असतं
कोणी नावे ठेवली तर थांबायच नसतं
आपलं चांगलं काम करायचं असतं
अपमानाने कधी खचायचं नसतं
जिद्दीने बळ वाढवायचं असतं
नाराज मुळीच व्हायचं नसतं
चैतन्य सदा फ़ुलवायचं असतं
पाय ओढले म्हणुन परतायचं नसतं
पुढे अन पुढे जायचं असतं
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं
रागात कोणाला बोलायचं नसतं
प्रेमाने मन जिंकायचं असतं
जीवनात खुप करण्याजोगं असतं
आपलं फ़क्त तिकडे लक्ष नसतं

No comments: