Thursday, May 8, 2008

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा

हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना
करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी
जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी
ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे
ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती
पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती
डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले
आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो

किट पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो

किट पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी
लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन
मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव
शिशुकौतुक पाहतो

गंगा जमुना डोळयात उभ्या का

गंगा जमुना डोळयात उभ्या का
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

कडकडूनी तू मिठी मारता बाळे
बालपण आले आले, घुमवित घुंगुर वाळे
आठवले सारे सारे, गहिवरले डोळे
कढ मायेचे तुला सांगती जा

दारात उभी राहिली, खिलारी जोडी
बघ दिर धाकले बसले खोळंबून गाडी
पूस गं डोळे या पदराने, सावर ही साडी
रुप दर्पणी मला ठेवूनी जा

मोठ्याची तू सून पाटलीण मानाची
हसले तुझे गं हिरवे बिलवर लगीन चुडे
बघू नकोस मागे मागे लाडके बघ पुढे
नकोस विसरु परी आईला जा

गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, दे प्रकाश, देई अभय

गगन सदन तेजोमय, तिमिर हरुन करुणाकर, दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव, हेच परम पुण्य धाम
वार्‍यातून, तार्‍यातून, वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण, हे तुझेच रुप सदय

वासंतिक कुसुमातून तूच मधूर हासतोस
मेघांच्या धारांतून प्रेमरुप भासतोस
कधी येशील चपल चरण, वाहीले तुलाच हृदय

भवमोचन, हे लोचन, तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ, भावमधुर गीत नवे
सकल शरण, मनमोहन, सृजन तूच, तूच विलय

धूंद मधुमती रात रे

धूंद मधुमती रात रे
धूंद मधुमती रात रे, नाच रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा नाथ रे, नाच रे

जल लहरी या धीट धावती, हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अली रमले कमलात रे, नाच रे

ये रे ये का मग दूर उभा, ही घटीकाही निसटून जायची
फुलतील लाखो तारा, परी ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनि, कटी भवती धरी हात रे, नाच रे

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी

दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरीणी, दे गडे भीती तुझी

मोहगंधा पारिजाता सख्या
हासशी कोमेजता रीती तुझी

तुज कळंका छेदिता जीवनी
सुस्वरे जन भारिते गीती तुझी

सोशितोसी झीज कैसी चंदना
मांगल्यास्तव त्याग ही नीती तुझी

चल नाच, नाच रे नंदिकशोरा

चल नाच, नाच रे नंदिकशोरा
सूर मुरलीचा घूमव जरा

रुमझूम रुमझूम पैंजळा वाजती
तालावरती गोती नाचती
सुर स्वर्गातूनी कौतूक पाहती
आनंदाचा दिवस खरा

जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मधे थबकला
कोकीळ गाई न गायनाला
काय जादू ही मुरलीधरा

चल नाच, नाच रे नंदिकशोरा

चल नाच, नाच रे नंदिकशोरा
सूर मुरलीचा घूमव जरा

रुमझूम रुमझूम पैंजळा वाजती
तालावरती गोती नाचती
सुर स्वर्गातूनी कौतूक पाहती
आनंदाचा दिवस खरा

जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मधे थबकला
कोकीळ गाई न गायनाला
काय जादू ही मुरलीधरा

भावभोळया भक्तीची ही एक तारी

भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भूकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी

भाबडी दासी जनी, गाताच गाणी
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी

भावभोळया भक्तीची ही एक तारी

भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भूकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा
मी तशी आले तुझ्या ही आज दारी

भाबडी दासी जनी, गाताच गाणी
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी

शापिलेली ती अहिल्या मुक्त केली
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

चिमणी मैना, चिमणा रावा
चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा
चिमणी जोडी, चिमणी गोडी
चोच लाविते, चिमण्या चार्‍याला
चिमणं, चिमणं, घरटं बांधलं चिमण्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला, त्याच्या पायाला

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला
गोजिरवाणी, मंजूळगाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकून गान्याला

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

बाई बाई, मन मोराचा कसा पिसारा फुलला

चिमणी मैना, चिमणा रावा
चिमण्या अंगणी, चिमणा चांदवा
चिमणी जोडी, चिमणी गोडी
चोच लाविते, चिमण्या चार्‍याला
चिमणं, चिमणं, घरटं बांधलं चिमण्या मैनेला

शिलेदार घरधनी माझा, थोर मला राजांचा राजा
भोळा भोळा जीव माझा जडला, त्याच्या पायाला

रे मनमोरा, रंगपिसारा, अंगी रंगूनी जीव रंगला
गोजिरवाणी, मंजूळगाणी, वाजविते बासुरी डाळिंब ओठाला
येडं, येडं, मन येडं झालं, ऐकून गान्याला

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू

अवचिता परिमळू, झुळकला अळुमाळू
मी म्हणे गोपाळू, आला गे माये

चांचरती चांचरती बाहेरी निघाले
ठकचि मी ठेलें काय करु

तो सावळा सुंदरु कासे पितांबरु
लावण्य मनोहरु देखियेला

बोधुनी ठेलें मन तव जालें आन
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये

बाप रखुमादेवी वरु विठ्ठल सुखाचा
तेणें काया मने वाचा वेधियेलें

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ

अरे अरे ज्ञाना झालासी पावन

अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान, कळो आले

तुझा तूंची देव, तुझा तूंची भाव
फिटला संदेह अन्य तत्वी

मुरडुनिया मन उपजलासी चित्ते
कोठे तुज रिते न दिसे रया

दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या

वृत्तीची निवृत्ती आपणां सकट
अवघेंची वैकुंठ चतुर्भूज

निवृत्ती परम अनुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला = sushant

शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा
हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे
हे वादळ उग्र वीजांचे
काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान
जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण
रायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडे
शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे
शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे
हे रुप शक्ति-युक्तिचे
हा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

गंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्या
शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या
धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार
अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस
सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज

शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय हो
ह्या भरतभूमीचा जय हो
जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

स्वर्गीची लोटली जेथे

स्वर्गीची लोटली जेथे
रामगंगा महानदी
तीर्थासी तुळणा नाही, आनंदवनभुवनी

त्रैलोक्य चालिल्या फौजा
सौख्य बंधविमोचने
मोहिम मांडीली मोठी, आनंदवनभुवनी

येथून वाढला धर्मु
रमाधर्म समागमें
संतोष मांडला मोठा, आनंदवनभुवनी

भक्तासी रक्षिले मागे
आताही रक्षिते पहा
भक्तासी दिधले सर्वे, आनंदवनभुवनी

येथूनी वाचती सर्वे
ते ते सवर्त्र देखती
सामर्थ्य काय बोलावे, आनंदवनभुवनी

उदंड जाहले पाणी
स्नानसंध्या करावया
जप तप अनुष्ठाने, आनंदवनभुवनी

बुडाली सर्व ही पापे
हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला, आनंदवनभुवनी

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव

अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडी कपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी ना उरला वाली आता, धरती दे गं ठाव

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलेना
असा रुतला पुढयांत भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आस्मानी तळ्यांत लाख रुसल्या गं गवळणी
दूर लांबल्या वाटेला रुखी रुखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी

आज गोकुळात रंग खेळतो हरी

आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी

तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी

सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी

त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी

ना सांगताच तू मला उमगते सारे

१.
ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद

२.
ही दरी धुक्याचे तळे जणू अनिवार
सांडला केशरी कुंभ उठे झंकार
कोवळ्या तृणांना जणू उन्हाचे डोळे
उमटले कळीवर पाय दवांचे... ओले...

३.
मी तुझ्या घराशी खरेच होतो आलो
थबकलो... जरासा - क्षणात मागे फिरलो
किती दूर पोचलो सर्व तोडुनी धागे
क्षण वळुन पाहिले... तुझा उंबरा मागे

४.
घननीळ रान घननीळ रातीला भिडले
सावळे डोह सावळ्या सावल्या ल्याले
चांदण्यात गोऱ्या भिने निळा अंधार
दूरात दर्वळे सृजनाचा हुंकार

५.
पाऊस किती दिवसांत फिरकला नाही
पाऊस कुणाला कधीच कळला नाही
पाऊस ऋतुचे निमित्त करूनी दिसतो
पाऊस पापणीआड... कधीचा.. असतो

६.
लय एक हुंगिली खोल खोल श्वासांत
ओवीत चाललो शब्दांच्या धाग्यात
लहडला वेल.. तो पहा निघाला गगनी
देठांना फुटल्या कविता पानोपानी

७.
ही लय प्रलयाच्या तांडवात घुमणारी
आकाराच्या देहातुन लवलवणारी
लय विश्चामधला रुणझुणता आभास
मरणाच्या तिमिरी लय - मिणमिणता श्वास

Tuesday, May 6, 2008

Saturday, May 3, 2008

http://www.orkut.com/Community.aspx?cmm=47979784
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=45418317
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=45775956
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=45782164
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=47969884

मित्रानो दिलेल्या लिंक वर क्लिक्क करून आपण माझ्या कॉम्मुनिटी पहा...



आणि सहकार्य करा...


आभारी आहे




http://mimarathi360.blogspot.com/2008/04/blog-post_2154.html



मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे.
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....

Friday, May 2, 2008

शब्दफुले……..

मैफ़ीली तशी सुनीच होती
पण भास गीतांचा होतच राहीला
ओठावर माझ्याही गीत आले
पण आवाज त्याचा अंतरातच राहीला
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
कसली ही धुंद,
कसली ही नशा
मी सैरावलो आहे
का घुमते ही दिशा?
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
दुसर्यांच्या मनाची व्यथा
मी जेव्हाही ऐकली
जखम त्याची मला माझ्या
जखमांपेक्षा गहीरी जाणवली

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
कल्पित रंगानी न पाहीलेल्या
फ़ुलाची मी खुप चित्र काढली
तो फ़क्त भास होता माझा
ज्या फ़ुलाची सुगंधीतता मी अनुभवली
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
आयुष्य एक पुस्तक असते
त्यात प्रेम नावाचे एक पान असते
ते पान फ़ाटल म्हणून
पुस्तक वाचणं सोडायच नसते

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

मोहक डोळ्यात तुझ्या
स्वप्ने माझी सजत आहेत
तुला ती सांगताना माझ्या
शब्दांची वात मात्र विझत आहे


-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तु निमित्त झाली असतीस तर
सगळ ठिकठाक राहीलं असत
तुझ्याकडुन फ़क्त साथच हवी होती
बाकीच सगळ मी पाहील असत


-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तु निमीत्त झाली असतीस तर
हे अंगण फ़ुलान्नी सजलं असत
तु मुक्यानेच तोडत गेलीस नाहीतर
प्रेमाच हे कुम्पण अस सहज तुटल नसत


-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
प्रेम म्हणजे एक कागदी नाव जीला
काळजाच्या पानाने बनवायची असते
पवित्र प्रेमाचा आकार देऊन तीला
नशीबाच्या पाण्यात सोडायची असते……..
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मुलीशी मैत्री केल्यावर तिच्याकडुन कधी
“प्रेमाच्या नात्याची” अपेक्षा ठेवायची नसते……..
तिच्या नितळ मैत्रीला “प्रेम” समजुन उगच
मैत्रीच्या नात्याची उपेक्षा करायची नसते…..


-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
जुगारी आहे भाव लावतो
मी सुख: दुखा:चा
नको ते प्रेम नको त्या वेदना
एकच उन्माद आता या मनाचा
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
सोडुन जाताना तिनं मित्रांनो
फ़क्त एकदाच मागं वळुन पाहील
मी रडतं का नाही म्हणत
सगळ्यांनी जखमेवर मीठ चॊळुन पाहीलं

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
पुर्ण न होण्यासारखं स्वप्न
आपण पहायचच कशाला?
स्वत:च नादानी करुन भोळ मन
वेडं ठरवायच कशाला?

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
पुन्हा तुझ्या आठणींमध्ये जगताना
या मनाला कसलाच होश नाही
पुन्हा तुझी आठवण काढली त्याने
यात माझा खरच काही दोष नाही
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तुझ्या आठवणीचा मोर तो
तुझ्या मैत्रीचं महत्व सांगत होता
आज मनाच्या गार सावलीला आला
रोज अश्रुंच्या उन्हात जो नाचत होता

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
तुझ्या प्रेमाने मला दाखवलेलं
ते स्वप्न कीती खोट होतं
त्या वेड्या स्वप्नालाही माहीत नव्हत
की त्याचं आयुष्य कीती छोटं होतं

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ओठावर हासु ठेवुन मनांच
दु:खं डोळ्यात मी लपवत होतो
पापणीवर दुकान मांडुन आसवांच
शब्दबाजारात त्याला मी खपवत होतो

-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मनाच्या फांदीवर लहरत बागडतं
पाखरु का असं मध्येच उडावं
अन श्वासांच्या परडीत जपलेलं चांदण
का ?सहज म्हणुन कुणीही खुडाव?
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
आयुष्य चार क्षणांतल हसणं-खेळणं
जीवनाचं आपण गुपित हे जाणावं
नशिबात जरी चौकटीतलच जगणं
तरी आपण भरलं आभाळ पाहावं

हीच ती परी, हीच ती अप्सरा…

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली….

हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले…?
पाखरु मनाचे शोधीती आसरा…..

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास…

हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा…….

हीच ती परी, हीच ती अप्सरा…
हाक अंतरी, भास आहे खरा…..

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने

सये, आज भिजलो तुझ्या अमृताने,
मी स्पर्शात ओल्या न्हाऊन आलो…
सवे, पाहिला मी हर्ष अंबराचा,
मी सोहळा दिशेचा पाहुन आलो…..

डोळ्यात तुझीया निजे सावली,
पैंजणे फुलांची सजे पावली…
प्रवास उद्याचा तुझा मखमली..,
मी वाटा सुगंधी शोधुन आलो…..

अंगणी चांदण्याची बरसात होते,
सर ही रुपेरी दारात येते…..
आता धुकेरी नको त्या मशाली,
मी चांद नभीचा घेउन आलो…….

हे बोल माझे तु ओळखावे,
अन, राज सारे तुज आकळावे
वा-यासवे सुर माळुन घे तु…
मी अंतरा तुझाच गाउन आलो….

ते सावल्यांचे गीत होते….

ह्या मावळतीचा रंग केशरी
स्मरणांचाही आला थवा
जो धुसर,कातरी,आठववेडा
क्षणही तो झाला नवा

श्वास-फ़ुलांच्या मातीवरती
अशी सणाणत आली वीज
दाही दिशांना झंकार झाला
क्षणात स्थिरले अवघे क्षीतीज

कीणकिणत्या नादानी सरींच्या
पुन्हा स्वरांना जाग आली
का देतो ओलेपण नको-नकोसे?
सर हसत्या एकांतास म्हणाली

म्हणे या भासांच्या धुद लहरी
हा गंध खोटा, हे रंगही खोटे
विशुदध रुप नव्या थेंबांचे
तळ्यात निर्मळ नशा लोटे

अजुन ती चाहुल विजांची
सये, सुर तुझे वेचीत येते
गुंजले जे मघा दिगंतरी
ते सावल्यांचे गीत होते….
ते सावल्यांचे गीत होते….

उत्सव अन, विस्तव………

आठवतं त्या क्षीतिजावरती?
फ़ुले सावळी उमलत होती..
अन, डोळे तु अलगद मिटता
किरणकळी तुज बिलगत होती..

बंद डोळ्याआड तुझिया
गंध कोवळा बरसत होता..
जणु दिशांच्या कायेवरुनी
रंग सोहळा उतरत होता..

आठवते का ते नभ निळे
रुप तुझ्यास्तव बदलणारे..
इंद्रधनुचे ते दिव्य पिसारे
अन, वक्ष पश्चिमी सजणारे..

तुझ्यासवे मी झेलत होतो
बहरणारा तो ओला उत्सव..
अंतरातली लय तव पुसता
मोहरणारा क्षण तो आठव..

घट्ट मुठीतुनी गतक्षणांच्या
आज ओघळती सये अंतरंग..
मनातल्या हळव्या तळ्यातही
का पाण्याविनाच उठती तरंग?..

आता सावळा रंग बरसता
सये थेबांतुनही येते थरथर..
तुझ्याविना मी जाळत जातो
क्षण हे ओले कातर कातर.

मज सलते खुण स्वप्नांवरची
जणु जखमा सत्य, जखमाच वास्तव..
तुझ्याविना त्या क्षीतीजावरला
विस्तव भासे मज तोच उत्सव..

अश्याच कधीश्या सांजवेळी

अश्याच कधीश्या सांजवेळी

कुठुन अलगद वारा येतो….

जुन्या घराच्या उंबरठ्यावर

मोरपिस एखादं सोडुन जातो…

मनास तेजाळणारे ते

निळसर हिरवे गर्द रंग

जणू प्रतीबिंबच आहे

तुझ्या-माझ्या नात्याच्या अस्तित्वाचं

प्रतीबिंब असं….जे..

सोबतीला कधी आठवणी..

तर कधी मागे फक्त भास…..ठेवुन जातं…

हे रान सावळे

श्रावणवेड्या गोकुळात या
घुमु लागला पावा हरीचा
सुर मिसळला हळवा, मंजुळ
अस्मानाच्या संथ सरीचा

कोसळते जसे स्वर नभातुन
थेंब येती तसेच सरसर
ओलसर काळ्या मेघाना त्या
साद देतो जणू हा मुरलीधर

गंध दाटला, रंग गोठला
तृष्णा ही आली स्वरात
स्पर्श जाहला, हर्ष वाहीला
आज राधाही होती भरात

उसळते झाले सुर कोवळे,
अन, यमुनेलाही पान्हा फ़ुटला?
उमगेना तव राधेलाही
गुंजनात या कान्हा कूठला?

हा हरीच स्वर अन, हरीच सुर
हरीच सर अन, हरीच पुर
हरीगीताचे हे मृगजळ सारे
हे रान सावळे, सावळेच वारे

श्वास थेबांतुनी पाउल झाला

असलो जरी चांद नभीचा
चांदतो मी पाण्यातही
हाती धरुनी पांगळ्या सुराचा
रांगतो मी गाण्यातही

पाडती सारे भाव खोटॅ
वेड्या मनाच्या टाकसाळी
शब्द होऊनी असा चमकतो
कधी मी ख-या नाण्यातही

मी असण्याला अर्थ नाही
नसनेही माझे व्यर्थ राही
मागे फिरता सवाल ठरतो
का राज दडती जाण्यातही?

का तोलीशी अजुन स्वतःला?
श्वास थेबांतुनी पाउल झाला
अन, तु उगा का थांबतो?
आहे तीच नशा वहाण्यातही

मज चांदणेही अफाट मिळते
तेही असेच मेघ गिळते
तरी अजुनी नशेत असता
चांदतो मी पाण्यातही….

शब्द

शब्द जहर, कधी शब्द कहर
कधी भावरंगी संथ लहर
लहरीतुनी स्वप्नरक्त वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

शब्द आस, कधी शब्द भास
कधी हृदयी घुटमळता एक श्वास
श्वासातुनी नाव ’ते’ घुमु लागते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

कधी शब्द रंग, कधी अंतरंग
कधी नकळत थरथर अन, तरंग
तरी नजर पुरावा अजुन मागते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

शब्द धुके, ते शब्दही मुके
कधी ही सोनेरी तनु झुके
राज पुसटसे खोलु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

शब्द गंध ही शब्द धुंद
पावले नशेची मंदमंद
नसांनसातुनी ’तीच’ वाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

शब्द मेघ ’ती’ चांदणरेघ
सावल्या कापती शब्दभेग
चांदण्यासवे ती झरु पाहते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

हा शब्द शब्द हा शब्द्स्पर्श
शब्दासवेही मी वाटतो हर्ष
जगणे मज शिकवुन जाते
मन शब्दातुनी बोलु पाहते….

या भिजल्या स्वरांना

ओठात सांजवेळी तु, सुर होऊनी येते
मोजुन श्वास माझे, माझे मलाच देते !!

सरी तुझ्या स्वरांच्या आसवांच्या ओळी
ओल्या सरीसवे तु, थेंब थेंब झरते !!

या भिजल्या स्वरांना देउ नकोस साद
भास द्याया पुरे गं, माझी मलाच गीते !!

मी मोजतो दुरावे, मी शोधतो पुरावे
अंतरही हात धरुनी मजला दुरात नेते !!

तो श्वास गुंतलेला, तो सुर संपलेला
ते इशारे क्षणांचे, सारे मलाच होते !!

त्या धुंदमंद राती, तुही नशाच होती
कोरडीच नशा आज, पेले माझेच रीते !!

Thursday, May 1, 2008

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

एक मेकांना दिलेल्या दुःखांवर

एक मेकांसोबत घालवलेल्या अनेक

आनंदी क्षणांचा लेप लावण्यासाठी..

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

अनेक जुन्या आठवणींनी आणलेले

एक मेकांच्या डोळ्यातील

आनंदाश्रु पुसण्यासाठी.....

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

आयुष्यात पुढे येणारया अनेक

दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या

हातात चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!

आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!

प्रत्येक दुःखी क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात

एक मेकांचा हात धरण्यासाठी,

एक मेकाला सावरण्यासाठी............

डोळे कशासाठी? कशासाठी?

डोळे कशासाठी? कशासाठी?

तुला साठवून मिटून घेण्यासाठी


आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस

आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी


नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले

शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी


वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली

वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी


असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा

ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी

मी मराठी आहे

ना राजकारणासाठी
ना मोठेपणासाठी
ना स्वार्थ साठी
जीव फक्त तडपतो
मराठी अस्मितेसाठी"

हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र

मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..

मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!


ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

जय शिवाजी जय भवानी....!!!

कार्य असे शिवबाचे
नाही कुणास जमायाचे
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे
छत्रपति शिवाजी महाराजाना मानाचा मुजरा


जय शिवाजी जय भवानी....!!!

"शिवाजी महाराज"

"शिवाजी आपला राणा
मराठी आपला बाना",
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
राजाधिराज योगिराज
"शिवाजी महाराज"
यांना मानाचा मुजरा

!!.....जय महराष्ट्र.....!!

नकळत डोळ्यांत पाणी येतं..

नकळत डोळ्यांत पाणी येतं..

मग आठवतात ते दिवस

जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,

माझं मन कासाविस होतं

मग त्याच आठवणीना..

मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,

वाटतं एकदाच तुला पाहावं

अन माझ्या ह्रदयात सामावुन घ्यावं..

पण सलतं मनात ते दुःख..

जाणवतं आहे ते अशक्य...

कारण देवानेच नेलयं माझं ते सौख्य...

पण तरिही.........

आठवण आली तुझी की,

देवालाच मागतो मी....

नाही जमलं जे या जन्मी

मिळू देत ते पुढच्या जन्मी....

काय हिच मैत्री असते.....

मराठी:
जीवनाच्या या अवघड वाटेवर
आपल्याला एकट्यानेच चालायाच असत
पण या वाटेच्या वळणावळणावर
कुणीतरी वाटसरु भेटतो........
कुणी दूरपर्यन्त सोबत देते....
तर कुणी अर्ध्या वाटेपर्यन्त सोबत करते..
पण अनेक गोड आठवणी देऊन जाते...

काय हिच मैत्री असते.....

हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात...

हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात...
हृदयाच्या एखाद्या चोर कप्प्यात
काही आठवणी जपायच्या असतात
व्यक्त करायच्या नसतात
पण.....
काही भावना जपायच्या असतात
हळुच एकांताच्या क्शणी
तो चोर कप्प उघडायचा असतो
कुणी बाजुला नाही ना
पाहुन डोळ्यातुन वाहू द्यायचा असतो
मनातल्या गोष्टी खरंतर
मनात राहू द्यायच्या नसतात
पण.....
त्या अशा कुणालाही
सांगायच्या नसतात !!!!!!! `

मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री

मैफ़लीत रंगून जाते ती मैत्री
जीवनात विलीन होऊन जाते ती मैत्री

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला.

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समज..............

मला एवढेच वाटते..................................

मला एवढेच वाटते..................................
मला एवढेच वाटते सुन्दर आयुष्य जगावे,
स्वप्नाचे गाव पवलोपावली बसावे

सुन्दर कल्पनानी सजलेले असावे,
वास्तवाचे भान मात्र सदैव रहावे

जगण्याला मानाचा मुजरा असावा,
अपमानाला क्षणीकही थारा नसावा

एक विश्वासाची सोबत असावी,
प्रेमाने मायेने मने जुळावी

मला एवढेच वाटते नवी आशा फुलावी,
येणार्या शतकची सुन्दर पहाट असावी.........

खरं सांगू, मला आवडतं!!

खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

निरर्थक बडबड करणं,
चांभारालाही मग 'काका' म्हणणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!

खरं सांगू, मला आवडतं!!

खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं असणं,
तुझं हसणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

पावलात अडखळणं,
दगडाला लागलं म्हणुन अश्रु गाळणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

निरर्थक बडबड करणं,
चांभारालाही मग 'काका' म्हणणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

एकांती किनारी बसणं,
स्वप्नांच्या होड्या करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

फुलपाखरांशी गप्पा मारणं,
त्यांना आपल्यातीलच समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझं लटकं रागावणं,
चिडले आहे भासवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

हिशोबात हरवणं,
बोटांवर बेरीज करणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

अंधाराला घाबरणं,
चंद्राला पापण्यांत लपवणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

सिनेमात सगळं विसरणं,
माझ्या खांद्याला रुमाल समजणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

तुझ्यासमोर मनाचा आरसा होणं,
शब्दांचा भार हलका होणं,
खरं सांगू, मला आवडतं!!

आता तुझं नसणं,
मग अश्रुंना गोंजारणं,
खरं सांगू, मला जड ज़ातंय!!!!

एक गंध हवा हवासा

एक गंध हवा हवासा
निशिगंधाचा जसा रात्रीला
एक गंध हवा हवासा
पहिल्या पावसात जसा मातीला..

एक स्वर हवा हवासा
तुझ्या कंठातून जसा शब्दांना
एक स्वर हवा हवासा
झाडावर सळसळणारा जसा पानांना..

एक स्पर्श हवा हवासा
हळूच तुझ्या हाताचा माझ्या हातांना
एक स्पर्श हवा हवासा
अलगद तुझ्या ओठांचा जसा माझ्या कानांना..

एक स्वप्न हवहवसं
मला पडलेल तुझ्या विचारांत असताना
ज्यात म्हणतेस तू 'तुझिच मी' पावसात चिंब भिजताना....

प्रत्येक गोष्ट मी आजकाल

प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही...
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ देत नाही...

दोन अश्रु तेव्हा मी ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते....
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु माझ्या डोल्यातच सुकले......

तुझी आठवण आल्यावर
पावलं तुझ्या आठवणीनकड़े वळतात....
पाउलवाटे वरच्या पाउलखुणा पाहून
माझ्याच डोल्यातुन दोन अश्रु गळतात...

डोल्यातुन गळनार्या अश्रुंमध्ये
रक्ताचे माझ्या थेम्ब काही......
ते टिपुन तुला तुझी चुक कलावि
एवढे तुझे नशीब नाही.....

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन
मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन

मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद
मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद

मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण
मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण

मैत्री म्हणजे स्पर्श न करता दिलेला आधार
मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार

मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास
मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास

मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास
मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी

जी माणसे हवीशी वाटतात

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही

जी माणसे हवीशी वाटतात

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही

तो चंद्र तुझ्या सारखा...

तो चंद्र तुझ्या सारखा...
तो चंद्र नभातला
क्शितीजा पार असलेला
मी माझा म्हणताना
माझ्याशीच रुस्लेला !!

कधी पाहून मजला
ढगा आड़ दडलेला
तरी नेत्र सुखाच्या आशेने
स्वप्नी मी चढलेला !!

नजरेत सग्या सोयार्यांच्या
दीवसाही रमलेला
कधी पौर्णीमेच्या रातरी ही
मलाच न गमलेला !!

प्रतीबींबाच्या रुपाने
जीवनात भास्लेला
आपुलकीने पाहताना
मी मात्र फस्लेला !!

तो चंद्र तुझ्या सारखा
नखशीखांत दाटलेला
चकोर मी उपेक्षीत
मनोमनी फाटलेला .....!!!!

कधी कधी, तू मला

कधी कधी, तू मला
जगण्याचा आभास वाट्तेस
जवळ नसताना असन्याचा भास वाट्तेस.

कधी कधी, तू मला
क्षणिक सुखा वाट्तेस
दुखाच्या कुसित निजउन
विश्वासघाती वाट्तेस.

कधी कधी, तू मला
छळनारी डायन वाट्तेस
स्वप्नात येउन जोपेचे खोबरे करून जातेस.

कधी कधी, तू मला
जवळची सखी वाट्तेस
राख रांगोली जालेल्या
स्वप्नाना सावरताना दिसतेस.

पण, नेहमीचा का ग तू मला !
रातरानी वाट्तेस ,गंधाराहित जीवनात
येउन सुगंध उधळनारी भासतेस.

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला

आहे बरेच काही सांगायला मला
काळीज ठेव तूही ऐकायला मला!

ठेवून ओळ गेली माझ्या वहीत ती
(झाला उशीर थोडा वाचायला मला)

असतो कधी इथे मी, असतो कधी तिथे
जावे कुण्या दिशेने शोधायला मला?

का रात्र मी अमेची जागून काढली?
येणार चंद्र नव्हता भेटायला मला

भेटायला हवे ते, का भेटले कधी?
आले नको नको ते बिलगायला मला!

हलकेच हात मीही हातात घेतला
होतेच शब्द कोठे बोलायला मला?
स्क्रॅप पोस्ट करा रद्द करा

आयुष्य म्हणजे कटकट..

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

प्रत्येक गोष्ट मी आजकाल

प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही...
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ देत नाही...

दोन अश्रु तेव्हा मी ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते....
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु माझ्या डोल्यातच सुकले......

तुझी आठवण आल्यावर
पावलं तुझ्या आठवणीनकड़े वळतात....
पाउलवाटे वरच्या पाउलखुणा पाहून
माझ्याच डोल्यातुन दोन अश्रु गळतात...

डोल्यातुन गळनार्या अश्रुंमध्ये
रक्ताचे माझ्या थेम्ब काही......
ते टिपुन तुला तुझी चुक कलावि
एवढे तुझे नशीब नाही.....

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस......

सुर्याच्या किरणांने झकाळलेला दव

सुर्याच्या किरणांने झकाळलेला दव

मोती बनून मिरवू लागला

येताच वाऱ्याची एक झूळूक

शेवटी मातीतच हरवू लागला

शेवटी प्रत्येक गोष्टीचा अंत असतो

निसर्ग क्षणाक्षणाला शिकवतो

इवलासा दव पण जिवनातलं

सर्वात स्वच्छ प्रतिबिंब दाखवतो

मैत्रीचे तीन प्रकार....

मैत्रीचे तीन प्रकार....
1.मित्र - ज्याच्याशी मत जुळतात्...
2.सखा - ज्याच्याशी आपण सुखदुःख् वाटतो
3.जिवलग - ज्याला आपली दुःख न सांगताच कळतात..
तुम्हाला कोण व्हायला आवडेल???
***************************
कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!! कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

जी माणसे हवीशी वाटतात

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही

ही वाट असे अंधाराची

ही वाट असे अंधाराची
अन थिजल्या काळोखाची
ही वाट असे उन्हाची
अन भयाण वाळवंटाची

हिरवीगार झाडी
अन थंड शीतल वारा
त्रुप्त मनी वर्षती
त्या पावसाच्या धारा

हा तर तव श्रान्त मनाचा
अविश्रान्त खेळ सारा
का व्यर्थ मांडिशी तू
स्वप्नांचा हा पसारा

ही वाट असे अंधाराची
हे वास्तव स्विकारावे
अन त्या थिजल्या वाटेलाच
आपलेसे करावे

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून

चांदण्या रात्री आकाशाकडे बघून
ढगांच्या पलिकडचे जग पहावं,
कुशित घेऊन तारे मोजावे वाटावं
असं कोणीतरी असावं

धगधगत्या आयुष्यात विसावा घ्यावा
ज्वलंत जीवनाचे चित्र निर्माण करावं
हातात हात घेऊन चालत रहावं
असं कोणीतरी असावं

ओलावलेल्या पापण्यांच्या कडा पुसून
थेट ह्रदयापर्यंत पोचावं,
असं नक्षत्रासारखं
कोणीतरी असावं....

लळा हा लागला जीवा

लळा हा लागला जीवा
लळा हा लागला जीवा

मैत्रीचं अतुट नाते हे अपुलं
दोघांनीही सहज जपलं

कधी रडू तर कधी हसू
हास्यासहीत हे पुसले आसू

रोज माझा तुला, किंवा तुझा मला
एक तरी एसएमस नक्कीच आला

येणारा एसएमस हा तुझाच असतो
चुकून कधी तरी दुसऱ्याचा असतो

मैत्री ही अपुली थोडी खास
इतरांना कदाचीत होतो त्रास

खरं सागुं, मला तुझ्या मैत्रीचा लळा लागलायं
मैत्री मैत्री म्हणता, तुझ्यात माझा जीव गुंतलाय

सकाळी उठलो तरी तुझाच चेहरा
रात्री झोपलो तरी तुझाच चेहरा

वाटलं नव्हतं तुझ्या भोवती इतका गुंतेण
रेशमाच्या किड्याचा तंतू बनून

कळंत नाही मनाला गं माझ्या
का लागली आस संगतीची तुझ्या

ठाऊक आहेत बंधनं तुझी नी माझी
तरी सुद्धा लळा लागला हा जीवा

खरंच होतो त्रास, पाहुन तुझं ते हास्य
जेव्हा कळतं नशिबी नाही माझ्या हे हास्य

आता मात्र ठरवलयं, का करुन घ्यायचा त्रास
नाही गोष्ट नशिबी मग उगाचच का ठेवू आसं

आता फक्त एकच नातं, अपुल्या गोड मैत्रीचं

शिकलो एक गोष्ट मात्र
करेन गोड मैत्री फक्त, नाही लाऊन घेणार लळा
कारण, लागला जर लळा तर, सहन होत नाहीत गं या कळा

हीच ती परी, हीच ती अप्सरा...

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

भरऊन्हात चांदणी ही कोठुन आली,
गंध यौवनाचे उधळे ही भोवताली....

हे रुप-वादळाचे नवे रंग कुठले...?
पाखरु मनाचे शोधीती आसरा.....

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

फुलल्या कळीचा हा दर्वळे सुवास
हृदय बावरे का? अधीरलेत श्वास...

हे मुके गीत ओठातुनी कैसे निघाले?
हरविले सुर सारे, भुललो मी अक्षरा.......

हीच ती परी, हीच ती अप्सरा...
हाक अंतरी, भास आहे खरा.....

!!!!मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा!!!!!

या देशावर मराठा कधी राज्य करेल का ?
या देशावर मराठा कधी राज्य करेल का ?
पुन्हा राजा जन्मेल का ?
कुठे जिजाऊ सापडेल का?
आज सारा देश महाराष्ट्रावर अतिक्रमण करतोय
पण आपण मराठे कट्ट्यावर सुपारी कातरत फक्त बोलतोय
की ,..... " हा होय मराठा म्हणतात तो मीच"....
आज जी वेळ मुम्बईवर आली आहे ती वेळ उद्या आपल्या जातिवर का येणार नाही ?
आजही आपला समाज्याचा मोठा वर्ग फक्त देव, आणि घर यातच का रमला आहे ?
सत्ता, राजकरण, राजकारणी तरुणपीढ़ी तिरस्कार करते आहे.
पण या गोष्टी सोडून आपला समाज आपले अस्तित्व कदपिही टिकाऊ शकणार नाही
चांगले उद्योजक , नेते , संशोधक आपल्यात तयार होण्याची आणि आताच्या नेत्यात , उद्योजकात
जातिबद्दल अभिमान निर्माण होण्याची गरज आहे .


!!!!मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा!!!!!

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर

धैर्य नव्हतं म्हणा हवं तर

अव्यक्त प्रेमाची कधीच वाटली नाही खंत
बाळगला संयम योग्यासारखा नव्हतो जरी संत
आनंद होकाराचा दुःख नकाराचं अनुभवु शकलो नाही
धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

ठरवू पाहात होतो मीच माझं प्रारब्ध
झालो तिच्यावर लुब्ध पण होतो निःशब्द
मागुन तिच्या मी उगीच भटकलो नाही
धैर्य नव्हतं म्हणा हवं तर पण मी चुकलो नाही

एक कळी

एक कळी
एक कळी आज मी पहिली
न इच्छा तिची उमलन्याची
न इच्छा तिची फुलन्याची
हिरव्या दला आड दडून बसलेली
एक कळी आज मी पहिली
जवळ जावुनी कारण पुसता
ती वदली 'का चौकश्या नुसत्या '
कळकळ मम ह्रुदयातिल तीज समजली
दु:ख वेदनेने काहीतरी ती बरगळली
"इच्छा आहे रे मज उमलन्याची "
"इच्छा आहे जीवन उपभोगन्याची "
पण नाही रे हे कधी शक्य मज
कारण .. खुडली गेलेय मी आज .

आजकालच्या ह्या मुली

आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या

बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात

गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट

सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला

यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात

पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले

सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही

म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो

मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
मी कुठेतरी वाचलं आनंद दिला की आनंद परत मिळतो
आणि आनंद परत मिळाला की जिवनाचा खरा अर्थ कळतो
मी आनंद दिला पण मला आनंद मिळाला नाही,
जिवनाचा अर्थ कळाला नाही
मी कुठेतरी वाचलं
आपण आपल्या प्रेमाला जगात मुक्त सोडावं
परत आलं तर ते आपण स्विकारावं
नाही आलं तर ते आपलं नव्हतंच

चैत्रपालवी परिसर सजला,

चैत्रपालवी परिसर सजला,
मोहरगंधे निसर्ग हसला,
कोकिळ गाई,सूर गवसला,
फिरून एकदा वसंत आला।
उद्या गुढीपाडवा!सर्वजितनाम संवत्सर शके १९२९ चा प्रारंभ!
नवीन वर्ष नव्या आशा, नवीन संकल्प घेऊन येत आहे! आपण त्याचे उत्साहाने स्वागत करू
स्क्रॅप पोस्ट करा रद्द करा

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा! for veena

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे!
मी असा कि लागती ह्या सावल्यांच्याही झळा

राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी
हे कशाचे दुख: ज्याला लागला माझा लळा!


कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
अन कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा?


सांगती तात्पर्य& माझॆ सारख्या खोट्या दिशा:
चालणारा पांगळा अऩ पाहणारा आंधळा!


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी:
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!

डोळ्यात माझ्या बघ तू

डोळ्यात माझ्या बघ तू
स्वप्न कशास म्हणावे
स्वप्नातुन माझ्या शिक तू
स्वछंद कसे जगावे

कानानी माझ्या ऐक तू
गीत कशास म्हणावे
गीतातुन माझ्या तू
सदैव बरसात राहावे

ओठानी माझ्या बोल तू
काव्य कशास म्हणावे
काव्यातुन सौन्दर्य माझे
तूच सख्या लुटावे

श्वासात माझ्या मला
तुझा गंध येतो
तुझ्या जाणिवेने
मला धुंद करतो

माझ्या अंगप्रत्यंगातुन
तुझा भास होतो
तुझ्याहून वेगळी कशी
हाच प्रश्न पडतो

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल


माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल


कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल


कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल

जी माणसे हवीशी वाटतात

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू

चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ

एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ

अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ

चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे

बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या

वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला

लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास

आजघर माजघर माजघराला नाही दार
गणपतरावांच्या घरात मात्र विंडोज दोन हजार

कर्दळीच्या वनात चंडोल पक्षी लपला
XXX शी लग्न करून YYY जन्माचा धुपला

कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
हिच्याशी लग्न करून मी घेतलिय मोठी रिस्क

रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल
गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

समुद्रच्या काठावर मऊ मऊ वाळू
गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू

लाडाने जवळ गेले, केली जरा घसट
गणपतराव एकदम खेकसले, फ़ारच बाई तिरसट

सखा.......

सखा.......
मैत्री कोणाशीही होऊ शकते असे म्हणतात.
पण Quality शिवाय मैत्री मी करत नाही.
नुसत्या ओळखिला मी मैत्री म्हणत नाही.
मैत्रीतल्या नात्याचा मी शोध घेत नाही.
मैत्रीमध्ये मला नेहमीच खुप सांगायचे असते.
पण अरे सांगायचे राहुन गेले....अशी सुरुवात असते.
तुझा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात असतो,
पण,शुभेच्छा देताना अरे आताच आठवले रे....
तुला जसे माझे Personal जाणायचे असते,
तशी मलाही उत्सुकता खुप असते.
पण तुला काय वाटेल,तु काय विचार करशील
प्रश्न बाहेर येतच नाही ...ं.Guessing नुसते.
तु जेव्हा Share करतो काही Personal
तेव्हा वाटते,We are so Close Friends....
पण,कोणाशी ते बोलणेे तुझी गरज असते.
आणी त्यातल्या त्यात Close मीच असते.
तरीही तुझे माझ्या फजितीला हसणे
माझ्या चुकान्वर मला समजावणे
माझ्या यशावर Party मागणे
मला आता याची सवय झाली आहे.
कशातही वाहणेे माझ्या स्वभावात नाही
पण तुझी मैत्री त्याला अपवाद आहे
तुझ्याशिवाय विचार अडतात माझे
होकार तुझा निर्नय असतात माझे
मैत्री आणी प्रेमात अन्तर असते
रेषा किती जाडीची असावी हा
ज्याचा त्याचा निर्णय आहे.
आपल्या निर्णयाचा मान आपल्या हातात आहे!!!!!!!

आज वाटेत चालतांना जरा एकटेपणा जाणावला

आज वाटेत चालतांना जरा एकटेपणा जाणावला
फ़ार काहि नाही डोळ्यांचा काठ तेवढा पाणवला....

वाटेवर होत्या तिच्या पाउलखुणा
मनातं मात्र त्यांचा अभाव जाणावला....

कधिकाळी होतीस ती बेधुंद लाट
आज तिच्या वागण्यात मर्यादितपणा जाणावला.........

कधितरी राज्यं करायचो शब्दांच्या जगावर
तरी का आज आमच्या संभाशणात शब्दांचा अभाव जाणावला..........

माझ्या हातातिल तिझा हात जेव्हा तीन सावधपणे सोडवला
तेव्हाच आमच्या नात्यातिल पवित्रपनाचा पराभव जाणावला....

मैत्री आणि प्रेम नाण्याच्या दोन बाजु
तरी प्रेमापुढे मैत्रिचा झालेला पराभव जाणावला....

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

जुळता तुजसवे, अनुबंध प्रीतीचे ...

जुळता तुजसवे, अनुबंध प्रीतीचे ...
फ़ुलला वसंत ग्रीष्मात, झाले चांदणे शब्दांचे !
मिळता नजर ही नजरेस तुझ्या ...
उठले तरंग मनी, स्वर गुंजले प्रेमगीतांचे !


स्पर्श मखमली होता, तनूस या तुझा ...
मोहरले मन, लाजूनी झाले मी चूर !
लाभता सहवास तुझा काही क्षणांचा ...
जगले जणू आयुष्यच, कशी राहू सांग आता दूर !


जडता नाते ह्रुदयाचे ह्रुदयाशी ...
भासले जणू ही गाठ असे जन्मोजन्मीची !
होता मधूर मीलन आपुले ...
कळले मज, होती हीच इच्छा नियतीची !

बघ.. माझी आठवण येते का..?

बघ.. माझी आठवण येते का..?

माझ्या विनंतीचा करुन धिक्कार..
कुणा भाग्यवंताचा करशील तू स्वीकार..
त्याच्या सोबतच्या एखाद्या धुंद क्षणाने..
एकांतातल्या तुझ्या झुरण्याने...
माझी आठवण पुसून निघते का?
सखे.. कितीही पुसायचा प्रयत्न केला तरी...
बघ.. माझी आठवण येते का..?

त्याच्या मुखावरच्या स्मिताने.. तुझी पहाट खुलत राहील..
तुझ्या डोळ्याच्या आतुरतेत.. तो आपले प्रेमच पाहील..
राजा-राणीचा हा संसार.. असाच पुढे बहरत जाईल..
सुखाच्या वर्षावात चिंब भिजूनही..
तुझे मन कोरडे राहते का?
अशाच एका कातर वेळी..
बघ.. माझी आठवण येते का..?

वार्धक्याच्या पाऊलखुणांनी.. जेव्हा तू थकून जाशील..
पतीच्या थरथरत्या हाताला धरुन.. स्वतःला सावरु पाहशील..
त्याची साथ तरी तुला.. आयुष्याच्या शेवटपर्यंत पुरते का?
आधारासाठी धडपडशील तेव्हा..
बघ.. माझी आठवण येते का..?

आजी झाल्यावर नातवांना.. राजा-राणीच्या गोष्टी सांगशील..
कधी राजपुत्र, परी आणि राक्षसाची.. सुध्दा सांगशील..
गोष्ट सांगता सांगता.. तुझे चित्त भूतकाळात हरवते का?
राक्षसाचे वर्णन रंगवताना तरी..
बघ.. माझी आठवण येते का..?

तू विसरून पुन्हा..मज आठवावे ..

तू विसरून पुन्हा..मज आठवावे ..
नसून मी जवळी..मज रूप तू स्मरावे..!
पाउस बरसतच राहिल...
मी मूरत जाईंन..खोल-खोल..!
तू विसरून पुन्हा..मज आठवावे.!!!!!!!!!!!

जन्माला येताना सगळी नाती मिळतात,

जन्माला येताना सगळी नाती मिळतात,

पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच जोडावे लागतात.

हिरे सगळे असले तरी, कोहिनूर एकच असतो.

म्हणूनच नाती सगळी असली तरी मैत्रीत जीव गुंततो

Wednesday, April 30, 2008

समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन..

समर्थ रामदास स्वामींनी केलेले शिवथर घळीचे वर्णन..

गीरीचे मस्तकी गंगा ।
तेथुनि चालिली बळे ।
धबाबा लोटती धारा ।
धबाबा तोय आदळे ॥ १॥

गर्जतो मेघ तो सिंधु ।
ध्वनि कल्लोळ उठीला ।
कड्यासी आदळे धारा ।
वात आवर्त होतसे ॥ २॥

तुशार उठती रेणु ।
दुसरे रज मातले ।
वात मिश्रीत ते रेणु ।
सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥

दराच तुटला मोठा ।
झाड खंडे परोपरी ।
निबीड दाटली छाया ।
त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥

गर्जती स्वापदे पक्षी ।
नाना स्वरे भयंकरे ।
गडद होतसे रात्री ।
ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥

कर्दमु निवदेना तो ।
मनासी साकडे पडे ।
विशाळ लोटली धारा ।
ती खाली रम्य विवरे ॥ ६॥

कपाटे नेटक्या गुंफा ।
तापसी राहती सदा ।
नेमस्त बांधली नाना ।
उत्तमे निर्गळे स्थळे ॥ ७॥

विश्रांती वाटते तेथे ।
जावया पुण्य पाहिजे ।
कथा निरुपणे चर्चा ।
सार्थके काळ जातसे ॥ ८॥

मैत्रीचे एक नाते असते.

मैत्रीचे एक नाते असते.

नकळ्त ते जुळ्त जाते.

त्याच्यात सगळे माफ़ असते.

त्यातून ते फ़ुलत जाते.

असू शकते वयात अतर

असू शकते त्यात मतातर

तरीही नाते रहाते निरतर

मदतीला धावून येते

कौतुकाची पावती देते.

मैत्रीचे नाते घट्ट करते.

आनद द्विगुणीत करते.

रग जात कुळ मैत्रीत नसते.

ती कित्येक रुपात जडते.

मैत्रीमुळे जीवनास रगत येते.

ही सवाना हवी असते.

एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
इथे हळुच येवुन विसावलाय..एक प्रवास

मासळी बाजार.......

मासळी बाजार.......

ये दादा हाकडं ये, बघ ताजा वाटा लावलाय......
अरे ये, बघ तर.........इस रुपयेच हाय......

अरे घे, कोनाकडेच असा मिलायचा नाय
आनी माका ठावुक हाय, तू घेतल्या बीन रावूचा नाय

पापलेट नाय सुरमय नाय ताजा ताजा वाटा हाय
इस लाच बघ दिला अकलेचा हां वाटा हाय......

ये माझ्या चिकन्या झिला, एक तरी घे......
आऊशिक बोल ज़रा मसाला लावून दे


ऐश्वर्या हाय, करीना हाय.....बिपाशा हाय, राखी पन हाय
त्या नको घेवूस.......खिशाला तुज्या परवडायच्या नाय...

बापूंची हाय, नेहरूची हाय, विवेकानंद हाय, नेताजी बी हाय.....
कनची हवी बोल, एकच घे.......समदया पचायच्या नाय......

अरे ये, असा परत मिलायचा नाय.....
आनी माका ठावुक हाय, तू घेतल्या बीन रावूचा नाय

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

कुणीच आपल नसतं..........

कुणीच आपल नसतं..........

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

मराठी पाउल पडते पुढे

स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफ़ांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे.
माय भवानी प्रसन्न झाली, सोनपावले घरास आली आजच दसरा आज दिवाळी
चला सयांनो अंगणी रेखु कुम्कुम केशर सडे
मराठी पाउल पडते पुढे.
पक्षी आम्ही वीर उद्याचे, बाळमुठीला बळ वज्राचे वारस होवु अभिमन्युचे
दूध् आईचे तेज प्रवाहे नसतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे
स्वये शस्त्र देशर्थ हाती धरावे
टिकावे रणी वा लदुनी मरावे
तुझ्या रक्षणा तुच रे सिद्ध् होसी
तुझ्या संकटी देव धावून येती
जय जय रघुवीर समर्थ
शुभ घडीला शुभ मुहुर्थी
सनई सांगे शकुन वंदिं
जय भवनी जय भवनी
दशदिशांना घुमत वाणी
जयजयकरे दुमदुमती हे सह्याद्रीचे कडे
गर्जती तोफांन्चे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे
मराठी पाउल पडते पुढे

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत
"इश्श…" म्हणुन मान खाली घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन, घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय" त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत......

हवी कशाला साथ कुणाची,

हवी कशाला साथ कुणाची,
माझेच आकाश अन् माझी धरती...
असाच एकटा चालत राहीन,
आभाळ घेऊनी खांद्यावरती...

उडत्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा
नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येईल केव्हा ही
क्षितीजांच्याही पलीकडे
झेप घेण्याची जिद्द असावी.........




तकदीर बनानेवाले तूने कमी न की,
अब किसी को क्या मिला ,
ये तो मुकद्दर की बात है ।

माज्या स्वप्नातल आयुष्य मी

माज्या स्वप्नातल आयुष्य मी
आंदन म्हणुन तुला दिल
कारण तुज्यापलिकडे सुद्धा जग आहे
हे मला तेव्हा नाही कळल
`

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,

संकटांना कधी कंटाळायचं नसतं,
त्याला सामोरच जायचं असतं
कोणी नावे ठेवली तर थांबायच नसतं
आपलं चांगलं काम करायचं असतं
अपमानाने कधी खचायचं नसतं
जिद्दीने बळ वाढवायचं असतं
नाराज मुळीच व्हायचं नसतं
चैतन्य सदा फ़ुलवायचं असतं
पाय ओढले म्हणुन परतायचं नसतं
पुढे अन पुढे जायचं असतं
लोक निंदेला कधी घाबरायचं नसतं
आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं
रागात कोणाला बोलायचं नसतं
प्रेमाने मन जिंकायचं असतं
जीवनात खुप करण्याजोगं असतं
आपलं फ़क्त तिकडे लक्ष नसतं

आठवणींशी नातं जडतं...

आठवणींशी नातं जडतं...
जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात....

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,

बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.

चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,

घर जवळ येताच पुढे निघून जावी.

आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,

दिसलो की गालवर छान खळी पडावी.

कधी हसता हसताच ती रडावी,

कधी रडता रडताच खुद्कन हसावी.

हक्काने आपल्यावर रागवावी,

मग कही न बोलताच निघून जावी.

नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,

आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.

सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,

निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.

लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,

वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.

ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,

नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.

सुखात सगळ्यांना सामिल करावी,

व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.

बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,

आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.

परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,

"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.

थोडा वेळ मग ती शांत रहावी,

पुढच्याच क्षणाला "माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

"मधुधुंद गंध, बेधुंद हवा....."

मधुधुंद गंध, बेधुंद हवा
मोरपिसी स्पर्श नवा....
सोड ना हात साजणा....
मंद कर ना रात दिवा....

कीणकिणतॉ बघ चुडा
चांदण्यांचा शेज सडा...
नजरेचे भलतेच इशारे
श्वासांचा आवाज चढा...

शाश्वतीचे वरदान असे
या क्षणांना चढलेय पिसे...
बेभान मदमस्त निशेत
देहभान सांग का नसे??..

काजळ अलवार विखुरले
स्वप्न समीप अवतरले.....
चढत्या भावनांचे काहूर
बाहुपाशात तुझ्या निवळले...
बाहुपाशात तुझ्या निवळले.....

असे आहोत आम्ही... बिन्धास्त मराठी...

असे आहोत आम्ही... बिन्धास्त मराठी...

आहो आम्हीच ते वीर मराठी
म्हणतात आम्हाला बिन्धास्त मराठी..

गप्पा गोष्टी अन ग़ॉसिप इथे चालती,
मैत्रीच्या या बीजाला स्नेहपालवी अंकुरती..

कधी उडतात इथे खटके अन कधी वादविवाद होती,
सवांदाच्या या कळ्या मनामनातून उमलती..

येतात पाखरे इथे अशी गरूड झेप घेवूनी,
आपल्याच तालात इथे घिरट्या घेती...

कधी इथे जमतो वर्ग बालपणीच्या शाळेचा
मग गुंफला जातो एक एक मोती आठवणीचा..

कधी कधी पाय खेचतात वर जाणार्‍याचे,
अन म्हणातात इथे सर्वानांच सोबत घेवून जायचे...

इथली पोरं लाईन मारायचा चान्स अजिबात सोडत नाही,
जुळतात इथे नाती प्रेमाची तेव्हा ती कधीच मोडत नाही...

भेटतात सारे एकत्र येथे अन धमाल उडवतात
विसरून सारे वैर आपसातले एकीचा मेळा भरवतात..

अश्या या बिन्धास्त मराठीला तुमचाही सहभाग असावा..
मराठीच्या या नंदनवनात तुमचा बिन्धास्त आस्वाद असावा...

फुले शिकवतात......,

फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;

रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;

सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;

बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;

मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;

कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं

आई साठी काय लिहू

आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुर्तिल एवढे, शब्द नाहीत कोठे
आई वर्ती लिहन्येत्पत, नाही माझे व्यक्तिमत्व मोठे,

जीवन हे सेत आई म्हणजे विहिर
जीवन हे नौका तर आई म्हणजे तीर
जीवन हे शाला तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी,

आई तू उन्हा मधील सावली
आई तू पावसातिल छतरी
आई तू थान्तिटली शाल
आता यावित दुखे खुशाल,

आई म्हणजे मंदिराचा उंच कलस
आई म्हणजे अन्गानातिल पवित्र तुलस
आई म्हणजे भजनात गुन्गुनावी आसी संतवानी
आई म्हणजे वाल वन्तात प्यावा अस ठंदगार पानी

जाते म्ह्न्तेस हरकत नाही,

जाते म्ह्न्तेस हरकत नाही,
काढत आश्रु पाहून जा,
नाते तोड्तेश हरकत नाही,
विझता स्वाश पाहून जा,
जानुण सारे सम्पवताना,
हीच येवडी विनंती,
हसते आहेश हरकत नाही,
बुद्ति नाव पाहून जा,
जालते आहेश हरकत नाही,
जल्नारे गाव पाहून जा,

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही

'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी
आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी
आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी
आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी
आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं,अम्हाला कधी समजलंच नाही
तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी
आम्ही सादा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी
आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही.

आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही

आयुष्याची रेसिपी

आयुष्याची रेसिपी

फार अवघड नाही आहे साधी सोपी,
सांगतो आज मी माझ्या आयुष्याची रेसिपी,

भात भाजी डाळ पोळी सगळे साग्रसंगीत आहे ,
जिभेवर रेंगाळेल अशी नक्कीच चव आहे,.

समाधानाची नरम पोळी , सोबत नवनवीन स्वप्नांची भाजी
प्रामणिकतेचा उबदार भात, मायेपरि गोडी वारणाची,

फोडणी त्यावर आठवणींची, आशेच्या तूपाची धार,
सुखाचे मीठ पेरलेय, महत्वाचे आहे फार,

आंबट गोड नात्यांचे लोणचे, पाणी सुटतेय तोंडाला,
सोबत पापड ही आहे थोडीशी कुरकुर करायला,

काय म्हणता.?..मसाले ... ते कसा विसरेन मी,
राग, लोभ, तिरस्कार, मत्सर, थोडेच घालेन म्हणतो मी,

रेसिपी संपली असे समजू नका , एवढ्यावर जेवण पूर्ण नाही,
दुखाच्या पाण्याचा ग्लास भरल्याशिवाय आयुष्याला अर्थ नाही,

रोज तृप्त होऊन असाच मी जेवणार आहे,
पदार्थ कदाचित बदलतील पण ताट तेच राहणार आहे.........!!!

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल


शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.


मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे


मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे


मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,

वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,

कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,

सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,

माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वडं करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं !!

किती दिवस - आणखी किती वर्षं..

एका ओंजळीत आयुष्य घेऊन जगतो मी
आणि ओंजळीतून थेंब थेंब गळून जावा
तसं आयुष्यही निसटून जातं क्षण क्षणाने
किती काही करायचं राहिलय..
आणि कुणास ठाऊक.. अजून किती जगायचं राहिलय..
कसं नेणार तडीस मी - जे मनात कुठेसं योजलय..
किती जगणार मी - विधात्याने तरी अद्याप कुठे मोजलय..........
----------------------------------------------------
कमी पडतय मला ओंजळीतलं आयुष्य जगायला
रात्रंदिवस असे का माझे भुर्रकन लागले उडायला

ओंजळ कित्ती घट्ट केली
मी मूठही वळून पाहिली
कित्येक दिवसरात्रींची
मग धार होऊन वाहिली

येणारा प्रत्येक दिवस म्हणून आता नव्यानं जगायचं ठरवलय
ओंजळीतून वाहून जाणारा काळ पदरात सांभाळायचं ठरवलय

किती दिवस - आणखी किती वर्षं.. प्रश्न नाही विचारायचा..
असूदेत कितीही.. तमा कशाला..
आता येणारा क्षणन क्षण अगदी कणा-कणाने वेचायचा...........

असाव कुणीतरी...................

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

आज राज ठाकरे (साहेब) यानी मराठी माणसाचा मुद्दा उचलला

प्रत्येक माणसाला आपल्या देशाचा अभिमान असतो; तसाच त्याला त्याच्या राज्याचा, भाषेचा ही अभिमान असने स्वाभाविक आहे.
आज राज ठाकरे (साहेब) यानी मराठी माणसाचा मुद्दा उचलला; राज साहेब याना पण मराठी भाषे बद्दल अभिमान आहे, आणि असाच अभिमान महाराष्ट्रात रहनारयाला असला पाहिजे, मग तो महाराष्ट्रतला मराठी मानुस असो वा परप्रन्ति.
आज बाहेरचे लोक मुम्बई मधे येउन मराठी माणसाला कमी लेख्तात, मग मराठी मानुस तरी किती शांत बसणार. त्यात मुम्बई मधे आज इतकी मानस भरली आहेत, की येथे नोकरी भेटत नाही. त्यात u.p.,बिहारी यांची दादागिरी किती सोस्नर मराठी मानुस.
आज राज सहेबानी मराठी मनसा साठी काही केले,तर राज सहेबांच काय चुकल.जर आज या मराठी मानसाच काही चुकल असेल तर ठीक आहे, ही चुक आम्ही (राज साहेब आणि मराठी मानुस) पुन्हा- पुन्हा करू आणि करणार.
इतिहास गवा आहे जेव्हा-जेव्हा मराठी मानुस बोलतो ती गोष्ट खरी करून दाखवतो.
याना (u.p., बिहारिना) तर आम्ही हे दखुनच देऊ.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

हिच असे माझी आई

पदर कसून ती स्वार स्कूटरवर
पाठी तिच्या मी मजेत निर्भीड
काय कशाची कसली चिंता
सोबत माझी आई असता

चाकोरीच्या पुढती जाऊनी
शिकवी आम्हा छंद नवे
खेळ नवे अन काम नवे हे
यापरी अजूनी काय हवे

सळसळता उत्साह तिचा हा
देई आम्हा स्फूर्ती नवी
नाही दिसली कधीच थकली
आई माझी सदा नवी

थोरांमधे नाही रमली
बालांमधे बाल मात्र ती
बालजनांचा मेळावा हा
वागवीत ती सदा भोवती

मऊ भातावर धार तुपाची
खमंग पिठले, चटणी जराशी
अजब तृप्त ती करुन आम्हा
देई तिची ऊबदार कुशी

देणारा हा हात तिचा तो
कधी न पसरला कुणापुढे
प्रत्येकाला हात मदतीचा
देण्या ती हो सदा धडपडे

थकली आता जरी जराशी
चाल मंदही झाली खाशी
तरुणाईला लाजवणारी
हीच असे आई माझी

मुलांवरी या उधळूनी जीवन
विसरुन जाऊन दु:ख उरातून
जीवनसाथी नसतासोबत
तयार केले आम्हा घडवून

सदा हसतमुख असणारी ती
उतारवयी हळवी होई
बांधलेल्या वास्तूचा हा
कळस पाहूनी तॄप्त होई

घाव उराचे झाकून ठेवून
जीवन पुढती चाले जी
स्वयंसिद्धा अन आत्माभिमानी
हिच असे माझी आई
हिच असे माझी आई

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस

गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नको

मैत्री कशी ह्ळुवार उमलते

मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव हात
हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

मैत्री

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी !!!!

!!!!....कधीतरी असेही जगून बघा....!!!!

माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
"किती जगलो" याऐवजी "कसे जगलो"?
हा एक प्रश्न जरा मनाला
विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही
हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

संकटांमुळे खचून जाणारे तर
शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात
करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर
नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी
काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

वर्तमान आणि भवि्ष्याची
चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या
वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन
निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा
एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा.....

प्रतिसादाची काळजी का
करावी नेहमी?
एखाद्यावर
जिवापाड,निर्मळ,एकतर्फी
प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग
कुतूहल करते
त्या अथांग भावनेची
व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा....

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध

हरवलंय सारं, जे अनुभवलं होतं कधी..
आता आहेत केवळ आठवणीं,
काही कडू काही गोड ...

आठवतात अजून ते
आजीच्या हातचे दहिपोहे,
घुमतात आजुनही कानात
देवघरातले आजोबांचे दोहे ...

दरवळतो आहे अजून हवेत
बागेतल्या त्या पहिल्या मोगîयाचा सुगंध,
पावसात चींब भिजलेल्या धरेचा
तो सुखावणारा परिमल मंद ...

आंबले आहेत दात अजून
त्या हिरव्याकंच कैरिने,
भिजून शहारलंय मन आतुर
श्रावणातल्या त्या पहिल्या सरीने ...

कुठे गेल्या त्या संध्याकाळच्या
शुभंकरोति अन रामरक्षा,
हरवला का तो वासुदेव
अन त्याला दिलेली भिक्षा ...

पण खात्री आहे मला
सापडतील सगळ्या गोष्टी हरवलेल्या ...
तो आजीचा हस्तस्पर्श, ते दहिपोहे, देवघरातले दोहे, त्या टवटवीत मोगîयाचा गंध ...

परत घेवून जाईल मला तोच दरवळणारा मॄदगंध

साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची

हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा
साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची
पण जेव्हा तो हात नकोसा होतो
तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची

नाती जोडता जुळवता प्रेम जडते
साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते
तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण
तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण

आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर
अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर
जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच
नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे

आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग
अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता
अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात
असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

खचू नका असे प्रसंग येता जाता
भय नामक राक्षसाला तारणारे
आत्मविश्वासाचे ब्रम्हास्त्र निर्माण करत राहा
आपल्या आयुष्याचा हिमालय असाच आत्मविश्वासाने चढत राहा ...

जगाव असे की.....

मला स्वच्छंदी निखळ,
कुणाचंही मन न दुखवता, हसत खेळत
सरळ साधं आयुष्य जगायला
आवडत. माझ्या भावनांशी आणि
तत्वांशी प्रामाणिक राहणं
मला प्रिय आहे

हे जीवन सुंदर आहे.
आणि हे सुंदर आयुष्य
तितक्याच सुंदरपणे
जगण्याचा प्रयत्न करणे.
बाकी काय !

आयुष्याचं गणित इतकं सोपं
कधी नसतच मुळी......
कारण नेहमीच दोन आणि दोन चार
होत नसतात..
कधी कधी तीच बेरीज तीन
चतुर्थाश सुद्धा होते..
ती बेरीज चारच व्हावी असा
अट्टहास कधीच धरायचा नसतो....
एवढं साधं सूत्र लक्षात
ठेवून जर आयुष्य जगलं तर
त्यात खूप सुख असतं....

जगाव असे की
मरताना प्रत्येक हृदयाने
साद द्यावी
नेता नेता मरणानेही आपल्या
जीवाला दाद द्यावी...... !

वेळ् आली आहे उडन्याची

हरु नको,खचु नको
वेळ् आली आहे उडन्याची
आहे पन्खाना आकाशवेध
मग भिती का पडन्याची?

शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत

हे कधी विसरू नको

दोन चिमण्या भेदरलेल्या

वादळ वाऱ्याला घाबरलेल्या

थरथरणारं काळीज घेऊन

वळचणीला बसलेल्या

चिमणी म्हणाली चिमण्याला

कशी तोंड देऊ या तुफानाला

वाटते मज भीती आता

होणार काहीतरी जिवाला

चिमणा म्हणाला चिमणीला

भिऊ नको घाबरू नको

मी आहे ना

तुझ्या संगतीला सोबतीला

पुन्हा पंखांत बळ येईल

दुबळं का होईना

थोडसं उडता येईल

तुला मला लागेल इतका

चिमणचारा मला

नक्कीच आणता येईल

पुन्हा सांगतो दु:ख करू नको

जे तुझं नाही त्याकडे पाहू नको

मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी

हे कधी विसरू नको

पडायच असत प्रेमात कधी कधी

सुंदर जीवनात कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी..

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत

विचारात गुंतल्यासारख कधी कधी

अन पाहताना तिच्याकडेच

विचारात गुंतायच असत कधी कधी..

रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच...

जागुन अशी रात्र काढावी कधी कधी

नंतर "जागली होतिस का रात्री?"

म्हणून विचारावे कधी कधी..

मागायचा असतो देवाकडे..

हात तिचा चोरुन कधी कधी

द्यायच असत आश्वासन त्यालाही

पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी..

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या

विषय तिचा निघाल्यावर कधी कधी

असते रागवायचे लटकेच

"अस काही नाहिये" म्हणून कधी कधी

विरहात तीच्या ...

असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी..

पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती ..

असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी..

पडायच असत प्रेमात कधी कधी

बघायच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी कधी...

ही आयुष्याची "गेम" असते...

अरेंज मॅरेज......एक ब्लाइण्ड गेम

पत्त्यांची जशी नेहमी "ब्लाइण्ड गेम" असते
तशी ठरवून केलेल्या लग्नाचीही असते......

तो-तिला नि ती-त्याला ओळखतही नसते
वीसेक लोकांत ओळख पटलेलीही नसते....

होकार असाच एका नजरेत द्यायचा असतो
बाकी सर्व नशिबावर सोडून द्यायचे असते...

काहींना कधी कधी असाच गुलामही मिळतो
तर काहींना कधी हुकूमी एक्का लाभतो....

काहीच्या नशिबी मात्र दुर्री-तीर्री च येते
कारण ही एक "ब्लाइण्ड गेम" असते....

येईल त्या पत्त्याने खेळून दाखवायाचे असते
जिंकून हरण्यापेक्षा,हरून जिंकायचे असते....

कारण "ब्लाइण्ड" जरी असली तरी
ही आयुष्याची "गेम" असते...

आयुष्यात एकरुप असुन

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
आसवे गाळून परत फ़िरले किनारे.

आयुष्यात एकरुप असुन सागराशी
दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे.

मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती
शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे.

वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा
सागरा घेऊन कुशित निजले किनारे.

साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत
संपण्याआधीच जिव हरले किनारे.

आज येऊदे प्रलय अचल मी उरेन
ठोकुन छाती मग गडगडले कीनारे.

पापण्यांती घेउन जखम जगी जगलो
निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे

मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....

मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन

आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,

बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."

तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....

वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे निजावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!!!!!

सांगा,उशीर होतोय का??????

ती माझ्याकडे बघते
मी तिच्याकडे बघतो
पण बोलणे होतच नाहि
बोलायला उशीर होतोय का?

काल सुद्धा तिने खूप वेळा पाहिले
माझेच लक्षच नव्हते
म्हणून मला नाहि कळले
बघायला सुद्धा आता उशीर होतोय का?

माझी नजर गर्दीतून तिलाच शोधत असते
तिची नजर देखिल कोप-यात वाट पहात असते
नजर मिळाल्यानंतर ती गोड हसते
मला हसायला उशीर होतोय का?

ती का बोलायला येत नाहि
याचा विचार मी करतो
आणि समोर आली कि मला सगळ्याचाच विसर पडतो
माझ्या विचरण्याला उशीर होतोय का?

दिवसामागून दिवस जात आहेत
आमचे नुसते असेच चालू आहे
कधी कोणी तरि पुढे येणार का?
अजून होणारा उशीर थांबवणार का??

आता सुद्धा मला उशीर होतोय
इतके दिवस तिला पहातोय
तिच्या सौंदर्याला शब्दात ऊतरवायला
उशीर होतोय का?
सांगा,उशीर होतोय का??????

काय हरकत आहे ?

आहे माझं प्रेम तुझ्यावर
जीव ओवाळते ना मी
वाट पाहते तुझ्या येण्याची
काय हरकत आहे....?

तुझं हसणं बोलणं वावरणं
आवडतं मला
तुझं निखळ स्वच्छ वागणं
मोहवितं मला
काय हरकत आहे...?

हो, मी पाहते स्वप्न
तुझ्या माझ्या स्वप्नांची
तू रंग भरावेस असंही वाट्त मला
काय हरकत आहे...?

माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला "तशी" स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?......

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.!!

मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे.
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी !!!!
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,
जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा.!!

ही माझी कविता स्वप्नात आली.

काल रात्री गाढ झोप लागली, सकाळच्या प्रहरी चक्क ही माझी कविता स्वप्नात आली. ती आपणा समोर सादर करीत आहे.

***

नाजूक , गोरीपान,लांबसडक तिची बोटे,
बोटांमध्ये शुभ्र पांढरा कागद...
प्रकटू लागली त्यावर अक्षरे,
माझ्या हृदयातून हळूच बाहेर पडून...
अक्षरांचे .झाले शब्द...
कमळाच्या पानावर दव बिंदू पडावेत तसे...
जणु तिच्या अंतरात पडत आहेत..


तिच्या ओल्या पापण्यान्मधून ,
थरथरत्या डोळयांतून प्रतिबिंबित होतात..
लपविले तिच्या ओठांनी शब्द...
पण समजावले थरथरत्या डोळ्यांनी...


डोळे तिचे सांगून गेले----
" सारे विखुरलेले क्षण,
हरवलेले सुंदर क्षण,
तू हळूवारपणे जोड...
म्हणजे जुळतील मने,
अंतर अंतरात सामावलेले असेल.."

खाडकन जाग आली,
नि ही कविता स्वप्नात आली.
कां आली मला जाग ?
कां तुटले हे गोड स्वप्न?


मीच माझ्यावर रागावलो,
मीच रुसलो , मी हसलो..
वेडे स्वप्न आपणास सांगण्यासाठी,
अधीर् मी झालो..

आता कोठे...

आता कोठे हसावयाचे शिकलो आहे
ज़खमांनाही जपावयाचे शिकलो आहे

आता बघुया कोण रोखतो भेट आपुली
स्वप्नि तुजला पहावयाचे शिकलो आहे

एकांताची मुळी न उरली भीती मजला
आठवनीतच रमावयाचे शिकलो आहे

रडगाणे मी कशास गाऊ लोकांमध्ये
अलगद अश्रू टिपावयाचे शिकलो आहे

जाता येता लोक पाहती मुग्ध होऊनि
चिखलामध्ये फुलावयाचे शिकलो आहे

जन्मोजन्मि मरणा संगे भेटी झाल्या
तेव्हा कोठे जगावयाचे शिकलो आहे

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!

मी मराठा ,मरकर भी नही हटा, वो मराठा!!!!
एक मावळा!!


अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही मराठयांना संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
'मराठा' शिवाय पर्याय नाही महाराष्‍ट्राच्या मातीला !!!
मी मराठी... या दोन शब्दात माझी ओळख आहे..
मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे.

कसं सांगू, कसं समजावू.....

हा आहे "आमचा महाराष्ट्र".
इथं आशाआकांक्षाना मिळते संधी, अन् इच्छांना श्वास.
मोठे येतात मोठे जातात, पण खचत नाही कधी हिम्मत अमुची....
गरीब किंवा सधन असो जेव्हा वेळ येते, आम्ही एक होतो,
पुण्याचा निवांत असो, किंवा मुंबईची धावपळ
जो थांबत नाही, जो थकत नाही, तोच आहे माझा महाराष्ट्र
कधी गल्ल्यांमध्ये घोष होई "गणपती बाप्पा मोरया"
कधी नवरात्रींचा रास रंगत होई दांडिया
जो आला त्याला आपला केला,
दु:खी दुबळ्याला, ओलावा प्र॓माचा दिला
हाच आहे छत्रपती शिवाजीं सारख्या वीरांचा महाराष्ट्र
पोलादासारख्या निर्धाराच्या सामान्य माणसाचा महाराष्ट्र
- एक मावळा!!

देश भक्ती हे पाप असे खरं,
तर मी पापी घोर भयंकर |
मात्र पूण्य ते असेल माझा,
नम्र तरी अधिकार तयावर||

" जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा... "

महाराष्ट्र दिना च्या हार्दिक शुभेच्छा !!!!

" जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ... "